प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रवेश आवेदन पत्र स्वतःच्या हस्तक्षरात सुवाच्च, अचूक व संपूण स्वरुपात भरुन द्यावे. आवेदनपत्रासोबत खालीलप्रमाणे प्रमाण पत्रे जोडावी लागतील.
अ
१. शाळा महाविद्यालय सोडल्याचे मूळ प्रमाणपत्र
२. मूळ गुणपत्रिका
३. चारित्र्य प्रमाणपत्र
४. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
५. जातीचे प्रमाणपत्र
ब
१. एच. एस. सी. परीक्षा खाजगीरित्या दिली असल्यास बोर्डाचे अस्थायी प्रमाणपत्र
२. इतर बोर्ड अथवा विद्यापीठातून येणारया विद्याथ्याचे मूळ स्थलांतर प्रमाणपत्र
३.पात्रता प्रमाणपत्र
१. प्रवेश देणे किंवा न देणे व प्रवेश दिल्यानंतर महाविद्यालयाचे नियम मोडणारया विद्यार्थांचे नाव काढून टाकणे यासंबधी संपूर्ण अधिकार प्राचार्यांकडे सुरक्षित आहेत.
२. प्रवेशाची अंतीम तारिख विद्यापीठ व शासन ठरविल . परंतु वर्गातील विद्यार्थी संख्या पूर्ण झाल्यास त्यापूर्वी प्रवेश बंद होऊ शकतो.
३. विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी प्रवेशास अपात्र ठरवल्यास त्याचे प्रवेश शुल्क परत केले जाणार नाही.
४.प्रत्येक विद्यार्थ्यांची विषयनिहाय ७५ टक्के(%) उपस्थिती असणे आवश्यक आहे, अन्यथा विद्यापीठाची परीक्षा देता येणार नाही.